कोसबाड नुतन बाल शिक्षण संघ मध्ये आपले स्वागत आहे
नूतन बाल शिक्षण संघ , कोसबाड सन १९१४ मध्ये टाइम्स ऑफ़ इंडियाने मदाम
मॉन्टेसरी यांच्या, ‘अनौपचारिक शिक्षण म्हणजेच आनंददाई शिक्षण’ याबद्दल एक लेख
छापला अणि अशा प्रकारच्या शिक्षणाची कल्पना भारतात कल्पना पोचली. १९१५ मध्ये
भारतातील पहिली अशाप्रकारची शाळा तेव्हाच्या गुजरात राज्यात स्थापन झाली., शिक्षण
क्षेत्रातील द्रष्टे आणि ध्येयवादी श्री. गिजूभाई वधेका यांनी मॉंटेसरींच्या
पाश्चात्य विचारांना भारतीय प्रणालीत बदलले. महात्मा गांधींच्या सूचनेवरून
गिजूभाईंनी स्थापन केलेल्या या लहान मुलांच्या सुसंघटित पण कठीण शिस्त नसलेल्या
आणि अनौपचारिक अशा आनंददायी शिक्षणाच्या बालमंदिरांमध्ये ताराबाई मोडक सामील झाल्या. नूतन बाल-शिक्षण संघाची
(नू.बा.शि.स.) स्थापना १९२६ मध्ये झाली. भारतातील पूर्व-प्राथमिक शिक्षणाचे पर्व
इथूनच सुरू झाले. नूतन बाल-शिक्षण संघाने
लहान मुलांच्या शिक्षण क्षेत्रात स्वतःचे स्थान पक्के केले. परंतु त्यांचे सर्व
प्रयत्न हे शहरातील संपन्न मुलांपर्यंत मर्यादित होते. असंख्य गरीब मुलांना, व
प्रचलित जातीव्यवस्थेमुळे पीडित मुलांना या शिक्षणाचा लाभ मिळत नव्हता. ताराबाई या
गांधीजींच्य तत्वांच्या खर्या अनुयायी होत्या. त्यांनी याप्रश्नाचा विचार केला
आणि प्रथम शहरातील झोपडपट्ट्या आणि इतत गरीब वस्त्यांवत त्यांचे लक्ष केंद्रित
केले. पूर्ण विश्वास होता की समाजातील वंचित लोकांच्या मुलांना पण त्याच प्रकारचे
शिक्षण देणे आवश्यक आहे, पण त्याची पद्धत वेगळी असायला हवी.
मॉटेसरींची शिक्षणपद्धती ही खूप खर्चाची आहे, कारण
त्यामध्ये विशिष्ट प्रकारची साधन-सामग्री लागते. ही शिक्षणपद्धती जर मोठ्या
प्रमाणावर आणि जास्त मुलांसाठी वापरायची तर त्यावर होणारा खर्च शक्य तितका कमी
करणे आवश्यक होते. यावेळी ताराबाईंचे लक्ष ग्रामीण आणि आदिवासी भागाकडे गेले. अनेक
अडचणींचा सामना करत, बर्य़ाच प्रयत्नांनंतर आणि अनेक धाडसी नवीन रस्त्यावरून
जाणारे निर्णय घेत ‘कोसबाड’चा जन्म झाला. आता नूतन बाल-शिक्षण सघाचे मुख्यालय
‘कोसबाड हिल, तालुका डहाणू, जिल्हा पालघर. महाराष्ट्र.’ येथे आहे.
Read More Download PDF